Wednesday, March 11, 2009

होळी

प्रिय सलोनी, आज होळी आहे। इकडे आल्यापासून आम्ही भारताबद्दल सर्वात जास्त काय miss करत असू तर भारतातील सण सणावर! अश्या सणाच्या दिवशी हटकून आपल्याकडची आठवण येते। जीव हळहळतो
होळिचा दिवस परंपरेने महाराष्ट्रात जूने जाउदे सरणालागुनी (!!) या पध्दतीने साजरा केला जातो .... जे जे जूने आणि अनिष्ट ते ते या दिवशी जाळायचे ..... बव्हंशी प्रतिकात्मिकारित्या परन्तु कधी कधी शब्दशः सुद्धा हरकत नाही!! पूर्वी होळी आणि रंगपंचमी हे वेगावेगले साजरे केले जात होते। मागील २० वर्षात मात्र जसजसे उत्तरेतील लोक महाराष्ट्रात येऊ लागले आहेत ... तसतसे महाराष्ट्रात आजकाल होळी ला रंगांची उधळण देखिल वाढली आहे। त्यामुले आता होळी आणि रंगपंचमी दोन्ही दिवशी रंग खेळला जातो। एकंदरीतच मला वाटते की होळी आणि दिवाळी हे सण भारतीय संस्कृतीचे सर्वात जास्त चांगले प्रतिनिधी आहेत। प्रकाश किंवा रंग कोणाला नको आहेत आयुष्यात? आणि ते जर वगळले तर आयुष्याला काय अर्थ आहे। गम्मत अशी आहे की या साध्या साध्या गोष्टी आपण इतक्या गृहीत धरतो की त्यांच्यापासून दूर गेलो की किम्मत कळू लागते। पाश्चात्य जीवन आणि संस्कृति चा गाभा हां खूप वेगळा आहे। जीवनाकडे ते संघर्ष आणि शोकान्तिकेच्या दृष्टिकोनातुनाच बघते। पाश्चात्य विचारवंत किंवा कलाकार यांचे लेखन संगीत काव्य नाटक सगळीकडे मानवाच्या अनुदात्त वर्तणुकीवर दृष्टी जास्त आहे। तो विचार चुकीचा नाही कारण तो विचार परिस्थितिजन्य आहे। पाश्चात्य लोकांचा पूर्ण इतिहास च मुली रक्तरंजित आहे। स्थल काल आणि पात्रे बदलतात। परन्तु अतीशय हिंसक वृत्तीचे प्रदर्शन अजूनही येथे आहे। आणि म्हणूनच इथे शस्त्रांचे (guns) महत्व आहे। असो ... परन्तु भारतीय संस्कृति आणि विचारसरणी तशी आशावादी प्रसन्न आणि माणसाच्या उत्तम गुणांना गौरवणारी आहे। पाश्चात्यांच्या तुलनेत कधी कधी भाबडी वाटेल..... परन्तु मला तरीही श्रेष्ठ वाटते।
प्रकाश आणि रंग जीवनात कोणाला नको आहेत? त्यांच्यामुळेच जीवन आहे आणि जीवनात आनंद आहे।
Happy Holi !!

2 comments:

Anonymous said...

तुम्ही फारच छान लिहिलंय - अगदी मनापासुन- आवडलं.. असंच लिहित रहा..
होळीच्या शुभेच्छा..

बाल-सलोनी said...

@kayvatelte

Dhanyavaad. Tumachya shabdanmule utsah vadhala! Aapalyalahi shubhechcha!